मागील वर्षी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला २३९ जागांवरच समाधान मानावं लागलं. एनडीएतील घटक पक्षांच्या साथीने भाजपा सत्तेत आहे. मात्र एका सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा एनडीए ३०० पार जाईल. एनडीए आणि भाजपासाठी तो झटका मानला गेला होता यात शंकाच नाही. मात्र त्यानंतर झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र आणि नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तम कामगिरी केल्याचं दिसलं. महाराष्ट्रात तर महायुतीला २३७ जागा मिळाल्या. २८८ पैकी २३७ जागा एखाद्या युतीला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दिल्लीतही भाजपाने ७० पैकी ४८ जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. इंडिया टुडे सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार आज लोकसभा निवडणूक पार पडली तर भाजपा आणि एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा