नेपाळला शनिवारी बसलेल्या जोरदार भूकंपापेक्षाही अजून महाभूकंपाची शक्यता जिओ हॅझार्ड्स संस्थेचे हरिकुमार यांनी व्यक्त केल्याचे वृत्त ‘द असोसिएटेड प्रेस’ने दिले आहे. दरम्यान, नेपाळमध्ये अन्न, पाणी, वीज व औषधे यांच्या तीव्र टंचाईला सामोरे जाणारे आणि भीतीच्या सावटाखाली वावरणारे हजारो लोक उघडय़ावर मुक्कामाला आहेत. येथील बळींची संख्या ४००० वर गेली असून, देशात आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. भारतातील बळींची संख्या ७२ झाली आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पश्चिम बंगालला ५.२ रिश्टर स्केलचा धक्का बसला.
जिओ हॅझार्ड्स संस्था भूगर्भातील हालचालींचा अभ्यास करते. शनिवारी नेपाळला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र भारत-नेपाळ सीमेवर हिमालयाच्या परिसरात भूगर्भात मोठा दाब तयार होत आहे. तो या भूकंपाच्या धक्क्यातून तो बाहेर आलेला नाही. त्यामुळे अजून महाभूकंपाची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. यापूर्वी नेपाळला १९३४ मध्ये ८ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला होता, याचीही आठवण संस्थेने करून दिली आहे.
नेपाळमधील भूकंपाला ४८ तास उलटून गेले असताना अनेक ढिगाऱ्यांखालून अद्याप मृतदेह सापडत आहेत. या भूकंपात ८ हजारांहून अधिक लोक जखमी, तर हजारो बेघर झाले आहेत. भारतासह अनेक देशांची मदत पथके काठमांडूत कार्यरत आहेत. काठमांडूची उपनगरे आणि ग्रामीण भागातही इंधन आणि औषधांची टंचाई निर्माण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा