मुंबईवरील २६\११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानकडून नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर भारताकडून याप्रकरणी आणखी ठोस कारवाई होण्याची गरज व्यक्त करण्यात आली. हाफिज सईद आणि सीमेवर दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांविषयी ठोस तोडगा निघाल्याशिवाय पाकिस्तानच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवता येणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले आहे. हाफिज सईद आणि इतरांविरोधात पाकिस्तानकडून यापूर्वीही अशाप्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. भारतामधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे वृत्त सोमवारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा