नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू यांनी बुधवारी म्हणजेच आज भाजपाला राम राम केला आहे. भाजपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आणि त्यांचा दृष्टीकोन यांचा योग्यप्रकारे प्रचार केला नाही. मला त्याविषयीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र ते पूर्ण झालं नाही त्यामुळे मी आता भाजपा सोडतो आहे असं चंद्र बोस यांनी जाहीर केलं. चंद्र बोस यांनी २०१६ मध्ये भाजपात प्रवेश केला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपाला राम राम केला आहे. २०१६ मध्ये चंद्र बोस यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं आणि २०१९ मध्ये चंद्र बोस यांनी खासदारकीची म्हणजेच लोकसभेची निवडणूक भाजपाच्या तिकीटावर लढवली होती.

काय म्हणाले चंद्र बोस?

“मला हे आश्वासन देण्यात आलं होतं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारधारेचा प्रचार केला जाईल. तसंच मलाही तो प्रचार करण्याची पूर्ण मुभा असेल. मात्र असं काहीही घडलं नाही. मला नेताजींची विचारधारा भाजपाच्या मंचावरुन देशभरात न्यायची होती. मात्र ते न घडल्याने मी आज पक्ष सोडतो आहे.” असं चंद्र बोस यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यांची सोडचिठ्ठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना लिहिली आहे.

dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…

राजीनाम्यात काय म्हटलं आहे चंद्र बोस यांनी?

कुठलाही धर्म, जात आणि पंथाच्या लोकांना ‘भारतीय’ या एका निकषावर एकजूट करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा मला प्रचार करायचा होता. भाजपामध्ये आल्यानंतर या विचारांच्या प्रचारासाठी आझाद हिंद मोर्चा तयार करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या परिने संपूर्ण प्रयत्न करत होतो. मात्र माझ्या प्रयत्नांना पश्चिम बंगालमध्ये भाजपाने कुठलाही पाठिंबा दिला नाही.

(

चंद्र बोस यांनी हे म्हटलं आहे की माझ्या प्रयत्नांना भाजपाने कुठलाही पाठिंबा दिलेला नाही. बंगालच्या लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मी एक विशिष्ट रणनीती आखली होती. त्यासाठी एक विस्तृत प्रस्तावही ठेवला होता मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आज मी पक्षाचा राजीनामा देतो आहे.

Story img Loader