भाजपाविरोधातील मोट बांधण्याकरता देशभरातील विरोधी पक्षनेते एकत्र येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात आज बैठक झाली. पश्चिम बंगालच्या सचिवालय कार्यालयात या तिघांनी चर्चा केली. “सर्व विरोधी पक्षयांची बैठक होण्याआधी आपण सर्व एक आहोत असा संदेश जाणं गरजेचं आहे”, असं ममता बॅनर्जी या बैठकीदरम्यान म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांची बैठक झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, “सर्व पक्षांनी एकत्र येत लोकसभा निवडणुका लढवल्या पाहिजेत. देशाच्या विकासासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एका व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. भाजपाला देशाच्या विकासाची चिंता नसून त्यांना स्वतःच्या प्रचाराची चिंता आहे.”

Shiva
Video: “तर ती माझ्या प्रेतावरून…”, आईचा विरोध पत्करून आशू शिवाला निवडणार; सर्वांसमोर देणार प्रेमाची कबुली, पाहा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
PM Narendra Modi
“मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी पाण्यात विष…”, पंतप्रधानांचा केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटवार
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
Delhi Poll
Delhi Assembly Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीत रंगणार आप विरुद्ध भाजपा सामना, ‘या’ ९ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

हेही वाचा >> महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: बृजभूषण सिंहविरोधात आंदोलनकर्त्या खेळाडूंची सुप्रीम कोर्टात धाव

“जेपी आंदोलन बिहारपासून सुरू झालं होतं. त्यामुळे सर्व पक्षीय विरोधकांची पहिली बैठक बिहारमध्ये झाली पाहिजे. या बैठकीतून एकतेचा संदेश गेला पाहिजे. या बैठकीसाठी मी नितीश कुमार यांना विनंतीही केली आहे. भाजपाचं नामोनिशाण मिटवणं आमचं उद्दीष्ट आहे. माध्यम, चुकीचे नरेटिव्ह, गुंडांचा वापर करून भाजपा हिरो बनली आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन भाजपाला झिरो केलं पाहिजे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसंच, विरोधी पक्षांच्या एकत्रित येण्यासाठी कोणाच्याही ईगोचा प्रश्न येत नाही. आम्हाला सामूहिक प्रयत्न पाहिजे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच विरोधी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. शरद पवार, तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर, तमिळनाडूचे मुख्यंत्री एमके स्टालिन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली आहे.

Story img Loader