मंगळवारी पाटण्यात बिहार सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार इंग्रजीत बोलणाऱ्या शेतकऱ्यावर चांगलंच संतापल्याचं बघायला मिळालं. ”हे इंग्लंड नाही तर भारत आहे, हिंदीत बोला”, असं म्हणत त्यांनी भरसभेत शेतकऱ्याला सुनावलं.

हेही वाचा – उत्तराखंडमध्ये कधीही होऊ शकतो मोठा भूकंप, शास्त्रज्ञांनी दिला इशारा; म्हणाले, “पृथ्वीच्या…”

Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
police Nagpur dance, police dance suspended nagpur,
VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…
UPSC lateral entry
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?
crowd gathered for the Ladaki Bahin Yojana program at Balewadi in Pune By forcefully bringing women scavengers
पुण्यातील बालेवाडीत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला अशी जमवण्यात आली गर्दी
acb arrested lawyer for taking bribe for property document registration
दस्तनोंदणीसाठी लाच घेणाऱ्या वकिलाला पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई
Shivsena Uddhav Thackeray,
शिवसेना उद्धव ठाकरे गट देणार नागपूरकरांना रोजगार, ३९ कंपन्यांमध्ये…

बिहार सरकार लवकरच राज्यात कृषी रोड मॅप लागू करणार आहे. त्यापूर्वी यासंदर्भात शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी बिहार सरकारच्यावतीने मंगळवारी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह अनेक विभागांचे मंत्री, अधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी शेतकरी आपलं म्हणणं मांडत असताना एका शेतकऱ्याने भाषणात इंग्रजी शब्दांचा वापर केला. त्यामुळे नितीशकुमार शेतकऱ्यावर संतापले. ”तुम्ही इंग्रजीत का बोलत आहात? हे इंग्लंड नाही, तर भारत आहे, तुम्ही हिंदीत बोलायला पाहिजे. इथे आलेले शेतकरी सामान्य कुटुंबातील आहे, त्यांना इंग्रजी कसं समजणार?” असं म्हणत त्यांनी भरसभेत शेतकऱ्याला सुनावलं. ”कोरोना आल्यापासून लोक आपली मातृभाषा आणि राज्यभाषा विसरत आहेत. प्रत्येकजण इंग्रजीचा वापर करतो आहे. जिथे इंग्रजीची गरज आहे तिथे त्याचा वापर व्हायला हवा. मात्र, इथे शेतीची चर्चा इंग्रजीत नाही तर आपल्या मातृभाषेत व्हायला हवी”, असंही ते म्हणाले.