उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ( २४ एप्रिल ) प्रचारसभेत बोलताना पूर्वीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. २०१७ पूर्वीच्या सरकारांना दंगली घडवण्यातून वेळ मिळत नव्हता. पण, आज उत्तर प्रदेशात कुठेही संचारबंदी लावली जात नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ते सहारनपुर येथे एका प्रचार सभेत बोलत होते.

“आता दंगली आणि गुंडगिरी नाहीतर उत्सव आणि महोत्सव ही उत्तर प्रदेशची ओळख आहे. ‘आज यूपी में न कर्फ्यू न दंगा, आज यूपी में सब ओर चंगा’ ( उत्तर प्रदेशात न संचारबंदी न दंगली, सगळीकडे परिस्थिती ठीक आहे )”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy
Atishi : अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट, मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप; म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, कारण…”

हेही वाचा : VIDEO : नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाल्या…

“उत्तर प्रदेशात आता कावड यात्रा काढण्यात येत आहेत. यापूर्वी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. आधी मुली घराबाहेर पडायला घाबरत होत्या. पण, आता उत्तर प्रदेशात भयमुक्त वातावरण आहे,” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

हेही वाचा : महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: बृजभूषण सिंहविरोधात आंदोलनकर्त्या खेळाडूंची सुप्रीम कोर्टात धाव

“आपल्याला २०१७ पूर्वीची जातीयवादी सरकार हवे आहेत, की गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार हवे आहे. तरुणांच्या हातात बंदुका पाहिजे की, टॅबलेट आणि स्मार्टफोन हे आपण ठरवायचं आहे. रस्त्यावर गुंडांच्या गोळ्यांचा आवाज पाहिजे की, भजनांचा आवाज?,” असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.

Story img Loader