उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज ( २४ एप्रिल ) प्रचारसभेत बोलताना पूर्वीच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. २०१७ पूर्वीच्या सरकारांना दंगली घडवण्यातून वेळ मिळत नव्हता. पण, आज उत्तर प्रदेशात कुठेही संचारबंदी लावली जात नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ते सहारनपुर येथे एका प्रचार सभेत बोलत होते.

“आता दंगली आणि गुंडगिरी नाहीतर उत्सव आणि महोत्सव ही उत्तर प्रदेशची ओळख आहे. ‘आज यूपी में न कर्फ्यू न दंगा, आज यूपी में सब ओर चंगा’ ( उत्तर प्रदेशात न संचारबंदी न दंगली, सगळीकडे परिस्थिती ठीक आहे )”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

Will Vijay Vadettiwar Pratibha Dhanorkar join the meeting in the presence of Congress Maharashtra State incharge Ramesh Chennithala
विजय वडेट्टीवार-खासदार धानोरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई; पक्षश्रेष्ठींसमोर तरी एकत्र येणार का?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
sanket bawankule vehicle hit and run case
नागपूर हिट ॲन्ड रन: बावनकुळेंच्या वाहनाची गती आरटीओ तपासणार नाही?
Nagpur hit and run case chandrashekhar Bawankules sons vehicle checked by RTO
नागपूर हिट ॲन्ड रन प्रकरण : बावनकुळे यांच्या पुत्राच्या वाहनाची आरटीओकडून तपासणी
Devendra Fadnavis first reaction on nagpur audi car hit and run case
नागपूर हिट अँन्ड रन प्रकरणावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ” पोलिसांकडे…”
Argument in Bar in 2016 BJP MLA Krishna Khopdes son had surrendered
बारमध्ये वाद : नागपूर भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पुत्राने केले होते आत्मसमर्पण
Dhule Eknath shinde shivsena marathi news
धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका

हेही वाचा : VIDEO : नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाल्या…

“उत्तर प्रदेशात आता कावड यात्रा काढण्यात येत आहेत. यापूर्वी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत होते. आधी मुली घराबाहेर पडायला घाबरत होत्या. पण, आता उत्तर प्रदेशात भयमुक्त वातावरण आहे,” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

हेही वाचा : महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण: बृजभूषण सिंहविरोधात आंदोलनकर्त्या खेळाडूंची सुप्रीम कोर्टात धाव

“आपल्याला २०१७ पूर्वीची जातीयवादी सरकार हवे आहेत, की गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारं सरकार हवे आहे. तरुणांच्या हातात बंदुका पाहिजे की, टॅबलेट आणि स्मार्टफोन हे आपण ठरवायचं आहे. रस्त्यावर गुंडांच्या गोळ्यांचा आवाज पाहिजे की, भजनांचा आवाज?,” असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे.