ओडिशा येथील बालासोर या ठिकाणी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन ट्रेन्सची धडक झाली होती. यातली एक मालगाडी होती तर इतर दोन प्रवासी ट्रेन होत्या. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अपघातात चूक कुणाची? हा देखील प्रश्न उपस्थित होत होता. अशात बालासोरचा भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता असा अहवाल रेल्वे बोर्डाने दिला आहे. अपघाताच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने अपघातासंदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी उघड केल्या आहेत.

Man Abusing traffic police Mumbai,
मुंबई : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून संगणकाची तोडफोड, आरोपीला अटक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
Action on encroachments in development plan near Durgadi Fort in Kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील ४० फुटी रस्त्यावरील २२ अतिक्रमणे जमीनदोस्त,भटाळे तलाव बुजवून उभारली होती बेकायदा बांधकामे
The Lok Adalat ordered Rs 4 crore compensation for bike riders family after collision
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात
cyber crime
New Cyber Fraud: मोबाइलच्या किपॅडवर ‘शून्य’ दाबताच लाखोंचा गंडा; या सायबर स्कॅमपासून सावध व्हा

अपघाताचं मुख्य कारण काय?

रेल्वे सुरक्षा आयोगाने (CRS) रेल्वे बोर्डाकडे स्वतंत्र अहवाल सादर केला आहे. सिग्नलच्या कामात बिघाड होता, त्रुटी होत्या. बाहानागा बाजार स्टेशन या ठिकाणी दोन समांतर रुळांना जोडणाऱ्या स्विचमध्ये त्रुटी होत आहेत हे जर स्टेशन प्रबंधकांनी लक्षात आणून दिलं असतं तर तशी पावलं उचलली गेली असती. मात्र सिग्नल यंत्रणेतला बिघाड हे अपघाताचं मुख्य कारण होतं असं या अहवालात म्हटलं गेलं आहे.

रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या स्वतंत्र चौकशी अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की सिग्नलिंगच्या कामात कमतरता असल्यामुळे अपघात झाला. तर बहनागा बाजार स्टेशन या स्थानकावरच्या लेव्हल क्रॉसिंग गेट ९४ वर इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर बदलण्यात आली नव्हती. त्यातही त्रुटी आढळल्याचं म्हटलं आहे.

ओडिशाच्या रेल्वे अपघातात २९० प्रवाशांच्या मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला. ओडिशातील बालासोर येथे २ जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत २९० जणांचा मृत्यू झाला तर, एक हजाराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक आहे.