Omar Abdullah on S Jaishankar’s remark over POK, Article 360 : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानने बळकावलेला भारताचा भाग (पाकव्याप्त काश्मीर) परत भारताला मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. तो हिस्सा भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल.” जयशंकर यांच्या या वक्तव्यावर भारत व पाकिस्तानमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, “कालच आपले परराष्ट्रमंत्री म्हणाले आहेत की आम्ही पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार आहोत. अहो, पण आम्ही त्यांना कुठे अडवलंय? तुम्हाला पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणायचा आहे, मग आणा. तुम्हाला अडवलंय कोणी? तुम्ही जम्मू-काश्मीरचा नकाशा पाहिलात तर त्यात आपला एक मोठा भूभाग पाकिस्तानात असल्याचं दिसतं. मात्र, काश्मीरचा आणखी एक मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाही.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा