एक्सप्रेस वृत्तसेवा लुधियाना (पंजाब) : पंजाबमध्ये ढोबळी मिरचीला किलोमागे एक रुपया दर मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मानसा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. पंजाबमधील शेतकऱ्यांनी गहू-तांदूळ ही पारंपरिक पिके सोडून अन्य पिके घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले होते; पण सध्या मिळत असलेल्या दराने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. मानसा जिल्ह्यातील भाईनीबाघा गावातील शेतकरी गोरा सिंग म्हणाले, ‘‘मान सरकारने पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन केल्यानंतर मी पाच एकरात ढोबळी मिरचीची लागवड केली होती. १७ किलो मिरचीची प्लास्टिकची एक पिशवी व्यापाऱ्याला विकली, त्याने फक्त १५ रुपये माझ्या हातात टेकवले. प्रति किलो एक रुपयांहून कमी दर मिळाला. वाहतूक, तोडणीचा खर्च वेगळाच. शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रावर लागवडीसाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा