काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर आता विरोधकांनी सरकारवर आगपाखड करायला सुरूवात केली आहे. माजी संरक्षण मंत्री ए.के.अँटोनी यांनी तर थेट काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळाची तुलना करताना आमच्या काळात केवळ एकदाच भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचे सांगितले. आम्हाला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. मात्र, आमच्या सरकारच्या काळात केवळ एकदाच अशी घटना घडली होती. तर भाजप सरकारच्या काळात तब्बल तीनवेळा असा प्रकार घडला आहे. या सगळ्याचा भारतीय सैन्याच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला असून एकूणच सुरक्षाव्यवस्थेविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सैन्याला योग्यवेळी मोकळीक देण्याची गरज ए.के. अँटोनी यांनी व्यक्त केली. माझा स्पष्ट संदेश आहे की, पाकिस्तानच्या अमानवी, नृशंस, क्रूर कृत्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याला मोकळीक द्यायला पाहिजे. सैन्याला काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने हाताळून द्याव्यात, असेही अँटोनी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा