नवी दिल्ली : ट्विटर वादावर काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना- ठाकरे गट अशा विरोधी पक्षांनी तसेच, शेतकरी संघटनांनी, देशात लोकशाहीची हत्या होत असल्याची तीव्र टीका केली आहे.ट्विटरचे बोधचिन्ह असलेल्या पक्ष्याचा गळा घोटणाऱ्या हाताच्या चित्रासह ‘हुकुमशहा एक भित्रा मनुष्य असतो’, असे ट्वीट काँग्रेसने केले आहे. २०१४ मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीवपूर्वक गळचेपी होत असल्याची टीका काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली. लोकशाहीची जननी असलेल्या देशात लोकशाहीची हत्या कशी होते, हे डॉर्सीच्या विधानाने उघड झाले आहे. आंदोलक शेतकऱ्यांना मवाली, खलिस्तानी, पाकिस्तानी, दहशतवादी अशी दूषणे दिली गेली होती, अशी आठवण काँग्रेसच्या प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपला करून दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा