मथुरा : मथुरेत जन्माष्टमीनिमित्त गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थातून विषबाधा होऊन १२०हून अधिक महिला आणि मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. जन्माष्टमीनिमित्त उपवास केलेल्या व्यक्तींनी पिठापासून बनवलेल्या पुरी आणि समोसे खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर तसेच इतर लक्षणे जाणवू लागली होती.

हेही वाचा >>> बलुचिस्तानमधील हल्ल्यांचा चीनकडून निषेध; पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईचे समर्थन

pm narendra modi speaks to putin on his ukraine visit also discusses measures to strengthen ties
युक्रेन भेटीवरून मोदी-पुतिन चर्चा; संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Rajkot Fort in Malvan/ CMO
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नाराजी; ‘शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेची राज्याकडून गांभीर्याने हाताळणी हवी’
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी
china condemns balochistan attacks support for pakistan s counter terrorism efforts
बलुचिस्तानमधील हल्ल्यांचा चीनकडून निषेध; पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईचे समर्थन
Scammer impersonates CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachud : “मीटिंगला जायचंय, ५०० रुपये पाठवा”, स्कॅमरने सरन्यायाधीशांच्या नावाने टॅक्सीसाठी पैसे मागितले; पुढे काय झालं?
Namibian cheetah Pawan died
Cheetah Pawan Died: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसा दिवशी आणलेल्या पवन चित्त्याचा मृत्यू; नामिबियावरून आणलेले ७ चित्ते मृत्यूमुखी
rajyasabha election
Rajya Sabha Elections : राज्यसभेवर १२ उमेदवारांची बिनविरोध निवड; एनडीएने गाठला बहुमताचा आकडा

मथुरा जिल्ह्यातील फराह पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावांतून रात्रीच्या वेळी प्रसादातून विषबाधा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आरोग्य विभागाच्या जलद प्रतिसाद पथकाचे प्रभारी डॉ. भुदेव प्रसाद यांनी सांगितले. विषबाधा झाल्यानंतर भाविकांना सुरुवातीला फराह कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णांचा आकडा वाढल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय तसेच वृंदावन आणि आग्रा येथील एसएन वैद्याकीय महाविद्यालयात हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

विषबाधा झालेले भाविक परखम, बडोदा, मिर्झापूर, मखदूम आणि खैरात गावातील आहेत. त्यांनी गव्हाचे पीठ झगडू आणि राजकुमार या दोन पुरवठादारांकडून खरेदी केले होते. तर फराहमधील प्रमुख किराणा व्यापाऱ्यांकडून त्यांनी या वस्तू खरेदी केल्या होत्या. जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी जिल्हा अन्न व औषध प्रशासनाला पुरवठादारांच्या दुकानांवर छापे टाकून दुकाने सील करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून आरोपी दुकानदारांचा शोध सुरू आहे.