काँग्रेसचे सचिव शकील अहमद यांनी भारतीय जनता पक्षाची(भाजप) पाकिस्तानातील आयएसआय संघटनेशी तुलना करणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशात जातीय दंगली झाल्या की, पाकिस्तानातील आयएसआय या दहशतवादी संघटनेला आणि भारतातील भाजप पक्षाला याचा आनंदच होतो. असे शकील अहमद यांनी म्हटले आहे
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणातून मुझफ्फरनगर येथील दंगलीवरून संशयाची सुई भाजपकडे असल्याचे दिसले. यावरून आता काँग्रेस जनांनी भाजपवर शरसंधान करण्यास सुरूवात केली आहे. शकील अहमद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पुढील ट्विट केले आहे.
Really true ! Whenever&wherever communal trouble erupts in this country two sets of people rejoice. Pakistan’s ISI&India’s Bhajpaei.
— Shakeel Ahmad (@Ahmad_Shakeel) October 25, 2013
सागर आणि इंदोर येथील सभांमध्ये राहुल गांधी यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली़ त्यांनी भाजपच्या ‘इंडिया शायनिंग’ अभियानाची खिल्ली उडवीत बुंदेलखंड हे या राजकारणाचे बळ ठरल्याचे म्हटले होते. त्याच वेळी त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीने आणलेल्या अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा आणि मनरेगा रोजगार हमी योजना आदींची आठवणही करून दिली़.