विरोधकांसोबतची कोंडी फोडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सुरू केलेले प्रयत्न सोमवारी निष्फळ ठरले. शरीफ यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवला असतानाही शरीफ यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे ही मागणी शरीफ विरोधकांनी आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही लावून धरली. ‘पाकिस्तान तेहरीके इन्साफ’चे अध्यक्ष इम्रान खान आणि धर्मगुरू ताहिरूल काद्री यांनी आपापल्या भूमिकेपासून तसूभरही न ढळण्याचा निर्धार कायम ठेवल्याने राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले. निदर्शकांनी रस्त्यांवर जागोजागी धरणे धरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम झाला.
विरोधकांच्या सर्व घटनात्मक मागण्यांवर आपण चर्चेस तयार आहोत. पण त्यांनी आधी सरकारसोबत चर्चेला यावे, असे आवाहन शरीफ यांनी इम्रान खान आणि ताहिरूल काद्री यांना केले, परंतु त्याला दोन्हीही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याउलट शरीफ यांनी ४८ तासांत खुर्ची सोडावी, असा निर्वाणीचा इशारा देत ‘सविनय कायदेभंग’ कायम ठेवला.
शरीफ सरकारने विरोधकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव खान यांच्या प्रतिनिधींनी साफ फेटाळून लावला.
शरीफ यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांसोबत बसून चर्चा करावी, या मागणीवर त्यांनी जोर दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा