आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात काय निर्णय घेतले जाणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधत असताना अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जातील असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. या अधिवेशनात नेमके कुठले निर्णय घेतले जातील हे अद्याप समोर आलेलं नाही. अशात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत कमीवेळा येतात आणि जेव्हा येतात तेव्हा त्याचा इव्हेंट करतात.

काय म्हटलं आहे खरगे यांनी?

राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत हे वक्तव्य केलं आहे की, “भारताचे पंतप्रधान जेव्हा पंडित नेहरु होते, त्यावेळी ते म्हणायचे की जर तुमचे विरोधक हे प्रबळ नसतील तर तुमच्या सिस्टिममध्ये काहीतरी कमतरता राहिल्या आहेत. सध्याची अवस्था अशी नाही. विरोधी पक्ष मजबूत स्थितीत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना कमकुवत केलं जातं आहे. आरोप करायचे, त्रास द्यायचा, मग त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि मग पक्षात स्वागत करायचं. हेच चाललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत खूप कमीवेळा येतात आणि जेव्हा येतात तेव्हा त्याचा इव्हेंट करतात.” असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…

मल्लिकार्जुन खरगेंनी मांडला मणिपूरचा मुद्दा

मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा मुद्दाही उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्या ठिकाणी जात आहेत, भेटी देत आहेत मात्र मणिपूरला जायला त्यांना वेळ नाही. आम्हाला संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात चर्चा हवी आहे. त्यावर उपसभापतींनी संमती दिली नाही. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरगेंनी टीका केली. अटलबिहारी वाजपेयी हे जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात २१ वेळा त्यांनी परंपरेवर भाष्य केलं. तर मनमोहन सिंग यांनी ३० वेळा संसदेच्या परंपरेवर भाष्य केलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त दोनदा भाष्य केलं ही खरंच लोकशाही आहे का? असाही प्रश्न खरगेंनी विचारला.