सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणून संसदीय स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले. माझा कोणावरही वैयक्तिक आरोप करण्याचा हेतू नाही. मात्र, संसदेत गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडणे, ही सवय बनता कामा नये, असे राष्ट्रपतींनी सांगितले.हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सत्ताधारी भाजपकडूनही हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविण्यात आला असून विरोधकांसमोर न झुकण्याची भूमिका घेण्यात आली आहे. या गोंधळासाठी सत्ताधारी आणि विरोधक परस्परांना जबाबदार धरत आहे. हा तिढा सुटत नसल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही सभागृहांमध्ये फारसे कामकाज होऊ शकलेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा