नितीश कुमार हे खूप मोठे संधीसाधू निघाल्याची सणसणीत टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष (राजद) लालू प्रसाद यादव यांनी केली. नितीश कुमार यांनी गुरूवारी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष लालू प्रसाद यादव काय बोलतात, याकडे लागले होते. यावेळी अपेक्षेप्रमाणे लालू यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीचे सर्व खापर नितीश कुमार यांच्यावरच फोडले. बिहारच्या जनतेने भाजपविरोधात जनमत देऊन मोदी-शहा जोडगोळीला राज्याबाहेरच ठेवले होते. पण आता नितीशकुमार यांनी स्वार्थासाठी भाजपशी हातमिळवणी केलीय. मी मातीत गेलो तरी भाजपशी हातमिळवणी करणार नाही, अशी नितीश यांची भाषा होती. मीदेखील त्यांना शंकरासारखं सर्वत्र राज्य कर, असा आशीर्वाद दिला होता. मात्र, नितीश हे भस्मासूर निघाले. ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा