PM Narendra Modi In Rajya Sabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांवरील कविता आकाशवाणीवर सादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना काँग्रेस सरकारने आकाशवाणीतून कायमचे हद्दपार केले.

त्यांना आकाशवाणीतून कायमचे हद्दपार केले

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, “नेहरूजी पंतप्रधान होते, ते पहिले सरकार होते आणि मुंबईत कामगारांचा संप झाला होता. मजरूह सुलतानपुरी यांनी त्यात एक कविता गायली होती, यासाठी नेहरूजींनी त्यांना तुरुंगात पाठवले. बलराज साहनी यांनी एका मिरवणुकीत भाग घेतला, त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर वीर सावरकर यांच्यावर एक कविता प्रसारित करण्याची योजना आखली होती, म्हणून त्यांना आकाशवाणीतून कायमचे हद्दपार करण्यात आले. इतकेच नव्हे तर. जेव्हा देव आनंद यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला नाही म्हणून त्यांच्या चित्रपटांवर दूरदर्शनवरून बंदी घालण्यात आली होती.”

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pm narendra modi at maha kumbh
पंतप्रधानांचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नान; महाराष्ट्र ते दिल्ली! मतदानाच्या दिवशीच मोदी काय काय करतात?
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Image Of PM Narendra Modi, Home Minister Amit Shah An Former CM Uddhav Thackeray
BJP : “मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला…”, १९९३ च्या दंगलीवरून भाजपा, उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना म्हटले की, “देशातील लोकांनी आमच्या विकासाचे मॉडेल पाहिले, ते समजून घेतले आहे आणि पाठिंबा दिला आहे. आमचे विकासाचे मॉडेल आहे. २०१४ नंतर भारताला प्रशासनाचे पर्यायी मॉडेल मिळाले. हे मॉडेल तुष्टीकरणावर (लांगुलचालन) केंद्रित नाही तर समाधानावर केंद्रित आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक गोष्टीत तुष्टीकरण होत होते. राजकारण करण्याची ही त्यांची पद्धत होती. काँग्रेस मॉडेलमध्ये एक कुटुंबच सर्वप्रथम येते.”

म्हणून आज काँग्रेची ही अवस्था

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “जर आपण आता काँग्रेसचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, त्यांनी अनेक सरकारे अस्थिर केली. ते याच कामात गुंतून राहिले. त्यांच्या या धोरणांमुळेच आज काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससोबत असलेले लोकही पळून जात आहेत.”

Story img Loader