संभल : ‘‘कालचक्र बदलले असून, विदेशात नेण्यात आलेल्या देशाच्या पुरातन मूर्ती आपण परत आणत आहोतच परंतु विक्रमी विदेशी गुंतवणूकही देशात होत आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. भारत नावाच्या मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे कामगिरी ईश्वराने आपल्यावर सोपवली असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हेही वाचा >>> सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमान अन् छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना, पाहा VIDEO उत्तर प्रदेशमधील संभल येथे श्री कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केल्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की एकीकडे तीर्थक्षेत्र विकसित केली जात असताना दुसरीकडे शहरांत आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. उच्च तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात आहेत. आज मंदिरे बांधली जात असतानाच देशभरात नवी वैद्यकीय महाविद्यालयेही उभारली जात आहेत. आज आपली पुरातन शिल्पेही परदेशातून परत आणली जात आहेत आणि विक्रमी विदेशी गुंतवणूकही येत आहे. हा बदल म्हणजे कालचक्र फिरल्याचा पुरावा आहे, असे ते म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. हेही वाचा >>> AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा! विविध मंदिरांचे दाखल गेल्या महिन्यातच देशाने अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनी रामजन्मभूमी मंदिर पूर्ण झाल्याचे पाहिले. देशापासून शेकडो किलोमीटर दूर अरब भूमीवर अबुधाबीमध्ये पहिल्या भव्य मंदिराचे उद्घाटनही आपण पाहिले आहे. या काळात आपण वाराणसीच्या विश्वनाथ धामचे वैभव बहरत असल्याचे पाहिले आहे. महाकालाच्या महालोकाचा महिमा पाहिला. सोमनाथचा विकास, केदारेश्वर मंदिराच्या खोऱ्याची पुनर्रचना आपण अनुभवली. ‘विकासाबरोबरच वारसाही’ हा मंत्रानुसार आपली वाटचाल सुरू आहे.