मणिपूरमधील घडमाऱ्या हिंसाचारावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. लोकसभेचं अधिवेशन पार पडल्यानंतर सध्या राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचा मणिपूरचा हा पहिलाच दौरा असणार आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षांपासून सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

मागील वर्षीच्या मे महिन्यापासून मणिपूर कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हा जातीय संघर्ष होत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी मणिपूरच्या चुराचंदपूर येथील हिंसाचारातील पीडितांची भेट घेतली. यावेळी हिंसाचारग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये यावे, आणि पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील लोकांचे म्हणणे ऐकवे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
jd vance refuses to accept trump s 2020 defeat in vp debate
ट्रम्प यांचा पराभव झालाच नव्हता; रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपद उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांचा दावा
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Odisha army officers fiance sexual assault news
Priyanka Gandhi : ओडिशातील ‘त्या’ घटनेवरून राहुल गांधींसह प्रियांका गांधींचं भाजपा सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “यांचं सरकार पोलिसांना…”
cm eknath shinde said Rahul Gandhi goes abroad and defames country
नागपूर : मुख्यमंत्री म्हणाले ” राहुल गांधी विदेशात देशाची बदनामी करतात….”
What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
jaishankar, Jaishankar khata khat,
S Jaishankar : “आयुष्य हे खटाखट म्हणण्याइतकं सोप्पं नाही, इथे…”; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा राहुल गांधींना टोला!

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद; चार जखमी

राहुल गांधी काय म्हणाले?

“भारत सरकार आणि स्वत:ला देशभक्त मानणाऱ्या प्रत्येकाने मणिपूरच्या लोकांशी संपर्क साधला पाहिजे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित केली पाहिजे. मला असं वाटतं की, पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरच्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी या ठिकाणी आलं पाहिजे. मणिपूरमध्ये काय चाललं आहे? हे पंतप्रधान मोदी यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मणिपूर हे भारतातील एक महत्वाचे राज्य आहे. पंतप्रधान मोदी हे जर येथे आले असते तर राज्यातील जनतेला दिलासा मिळेल”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, मणिपूरमध्ये जे घडतंय ते देशामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी मी पाहिलं नाही. त्यामुळे मोदींनी मणिपूरमध्ये येऊन येथील लोकांना धीर द्यायला हवा. मणिपूरमधील परिस्थिती व्यवस्थित होईल, अशी अपेक्षा आहे. पण सध्या दुर्दैवाने येथील परिस्थिती चांगली नाही. राज्यात द्वेष आणि हिंसाचार पसरला आहे. या सर्व गोष्टीचे मला मला राजकारण करायचं नाही. पण मणिपूरमधील परिस्थिती पाहून वाईट वाटते. या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करण्यास आम्ही तयार आहोत”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं