नवादा (बिहार) : अनुच्छेद ३७०च्या मुद्दयावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षांची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीसारखी आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केला. तर काँग्रेसने राजकीय पक्ष म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला.

राजस्थानमधील जयपूर येथे शनिवारी झालेल्या सभेत खरगे यांनी ‘‘जम्मू आणि काश्मीर व राजस्थानचा काय संबंध? राजस्थानात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी अनुच्छेद ३७०बद्दल का बोलत आहेत, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत?’’ अशी टीका केली होती. त्याला खरगे यांचे नाव न घेता मोदी यांनी उत्तर दिले.

RSS, BJP, Mohan Bhagwat
भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही
President rule, Balasaheb Thorat,
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी
Sharad Pawar, Sharad Pawar on Educational Expansion in Maharashtra, pune
राज्यातील शिक्षण विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आवश्यक- शरद पवार
Sharad Pawar, Vidarbha tour, sharad pawar in Nagpur, sharad pawar vidarbh tour, Nagpur,
शरद पवार नागपुरात, दणक्यात स्वागत; नेत्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष
supriya Sule hopes that Maharashtra also gets justice
महाराष्ट्रालाही न्याय मिळावा;  सुप्रिया सुळे यांची अपेक्षा

हेही वाचा >>> ‘बेरोजगारी हा निवडणुकीतील मोठा मुद्दा’

बिहारमधील नवादा येथील प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले की, ‘‘काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे पद ही काही लहान बाब नाही. त्यांना असे वाटते की अनुच्छेद ३७०चा राजस्थानशी काहीही संबंध नाही. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही का? त्यांची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीसारखी आहे.’’

मोदी पुढे म्हणाले की, ‘‘इंडिया आघाडी राज्यघटनेविषयी बोलते. त्यांच्या नेत्यांनी लोकांना सांगावे की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्णपणे राबवता का आले नाही? हे करण्यासाठी मोदींची गरज का पडली?’’ या वेळी त्यांनी कर्नाटकचे काँग्रेस खासदार डी के सुरेश यांच्या स्वतंत्र दक्षिण भारताच्या विधानाचाही संदर्भ दिला. यावरून काँग्रेसची मानसिकता समजते असा दावा मोदींनी केला.   भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आरोप केला की, ‘‘काश्मीरच्या विलीनीकरणाचा इतर राज्यांशी काय संबंध असे जर काँग्रेस पक्ष म्हणत असेल तर त्यांना देशाच्या एकता आणि अखंडत्वासाठी घेतलेल्या शपथेविषयी कोणताही आदर नाही.’’ काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान जवळपास गमावलेच आहे, आता नैतिकदृष्टया त्यांनी राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात उरण्याचाही अधिकार गमावला आहे.