पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल शांतता पुरस्काराच्या मच्छराने चावा घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तर आधीच या पुरस्काराच्या मच्छाराने चावा घेतला होता. अशी टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे. मोदी-शरीफ यांच्या भेटीत काय झाले, हे राष्ट्राला त्यांनी सांगितलेच पाहिजे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावरही तिवारी यांनी टीका केली आहे. ऑल इंडिया रेडिओचा गैरवापर थांबला पाहिजे, पंतप्रधान जर सार्वजनिक प्रसारणसेवेचा वापर करत असतील तर, विरोधीपक्षांनाही ही संधी मिळाली पाहिजे.मन की बात हा राजकीय कार्यक्रम नाही, त्यामुळे या कार्यक्रमातून राजकारणकरण्यापेक्षा लोकांना यात सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे, असे तिवारी यांनी म्हटले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 27-12-2015 at 15:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm must tell the nation what transpired between pm modi and nawaz sharif manish tewari congress