पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. शेरोशायरीचा वापर करत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. जेवढा चिखल उडवाल तेवढं कमळ फुलेल, असं म्हणत मोदींना विरोधकांना टोला लगावला. यावेळी मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करत गांधी परिवारावरही शाब्दिक हल्ला चढवला.

नरेंद्र मोदी म्हणाले, “अशाप्रकारची वृत्ती असणाऱ्यांना मी इतकंच सांगेन की, ‘किचड उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था उसने दिया उछाल…’. तुम्ही जितका चिखल उडवाल तेवढं कमळ फुलेल. त्यामुळे कमळ फुलवण्यात विरोधकांचं जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान आहे त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो.”

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ पाहा :

“विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, आम्ही ६० वर्षात भक्कम पाया बनवला. आता त्यांची तक्रार होती की, पाया आम्ही तयार केला आणि श्रेय मोदी घेत आहे. मात्र, २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर मी गोष्टी बारकाईने पाहिल्या. तेव्हा लक्षात आलं की, ६० वर्षे काँग्रेस परिवाराने केवळ खड्डेच खड्डे निर्माण केले होते,” असा आरोप नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबावर केला.

हेही वाचा : “…तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका”, प्रविण तोगडीयांचं मोठं विधान, म्हणाले, “मोदी-शाहांनी…”

“गांधी परिवाराचा हेतू चांगलाही असेल. मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये. मात्र, त्यांनी खड्डेच खड्डे निर्माण केले,” असंही मोदींनी नमूद केलं.

Story img Loader