गेल्या महिन्याभरापासून देशभरात निवडणूक रोख्यांचा विषय चर्चेत होता. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर भारतीय स्टेट बँकेने विकलेल्या आणि त्यानंतर राजकीय पक्षांनी वटवलेल्या निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आला. त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाने हा तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या तपशीलांनुसार गेल्या पाच वर्षांत देशभरात जितके निवडणूक रोखे वटवण्यात आले आहेत, त्यापैकी तब्बल ५० टक्के निवडणूक रोखे एकट्या भाजपानं वटवले आहेत. त्यातलेही बहुतांश रोखे २०१९ च्या निवडणुकीच्या काळात वटवण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीवर टीका करू लागले आहेत. या टीकेला भाजपामधील काही नेत्यांनी उत्तर दिलं तर काहींनी मौन बाळगलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांत यावर काही बोलले नव्हते. मात्र मोदी यांनी अखेर यावर भाष्य केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा