विषारी दारू प्यायल्यामुळे गया जिल्ह्य़ात सोमवारी आठ जणांचा बळी गेला आहे. बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या दारूमुळे विषबाधा होऊन गेल्या महिन्याभरात मरण पावलेल्यांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.
सोमवारी रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारूमुळे सातजण मरण पावले तर चेरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे प्रकृती बिघडलेल्या चार जणांना अनुगड नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक राकेश दुबे यांनी दिली. बिहारचे पोलीस महासंचालक अभयानंद यांनी मगध विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक नायर हुसैन यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा