देशात विद्युतीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना तयार केली असून त्याअंतर्गत आता ग्राहकांना मागणीनुसार विद्युतजोडणी मिळणार आहे. तसेच नव्या जोडणीचे शुल्क मासिक हप्त्यांद्वारे भरण्याचीही सोय असेल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिली.
सध्याच्या धोरणानुसार दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना मोफत वीजजोडणी दिली जाते. मात्र त्याच्या वरच्या स्तरांतील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी नोंदणीप्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी असेल. शक्य असेल तेथे सरकारी कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन अर्ज भरून घेतील. आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी इतक्या माहितीवर नवी जोडणी मिळू शकेल, अशीही माहिती त्यांनी दिली.
१ मे २०१८ पर्यंत देशातील १८,४५२ गावांत विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट असून ते एक वर्ष आधीच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा