काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदीविरोधी सूर आळवला असतानाच आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी, न्यायालयाने निर्णय देऊन मोदी यांना निर्दोष ठरविले असल्याने त्यांच्यावर पुन्हा दंगलीबाबत आरोप करीत राहणे चूक असल्याचे विधान केल्याने राजकीय क्षेत्रात बुधवारी खळबळ उडाली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी पटेल यांच्यावर आगपाखड केली असून मोदीसमर्थक मात्र ‘राष्ट्रवादी’ पटेलांमुळे प्रफुल्लित झाले आहेत.
गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या दंगलीबाबत न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारण्यात यावा आणि त्याबाबत आणखी प्रश्न उपस्थित करण्यात येऊ नयेत, असे मत पटेल यांनी व्यक्त केल़े आजच्या युगात कोणत्याही बाबतीत न्याय मिळविण्यासाठी न्यायालय ही अंतिम यंत्रणा आह़े कोणत्याही विवादास्पद मुद्दय़ावर न्यायालयाच्या निर्णयानंतर पूर्णविराम मिळतो़ त्यामुळे न्यायालयीन यंत्रणेने एखादा निर्णय दिला असेल तर त्याचा आदर करणे आपल्याला बाध्य आह़े त्यावर आपण पुन्हा प्रश्न उपस्थित करू नयेत, असे पटेल यांनी येथे पत्रकारांना सांगितल़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा