गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनासाठी उपोषण छेडलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे यांनी मागणी लावून धरली आहे. तर, अनेक राजकीय नेतेही या मागणीसाठी अडून बसले आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय आज सभागृहात मांडला. खासदार झाल्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेत भाषण केलं. त्यामुळे त्यांच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं.

“सरकार अनेक कंपन्यांचं खासगीकरण करत आहे. यामुळे आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान सुरू आहे. आमच्या महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. जरांगे उपोषणाला बसले आहेत. धनगर समाज एसटीत येण्यासाठी मागणी करत आहेत. परंतु, राज्य सरकार तणाव वाढवत आहेत”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
mahayuti, Abdul Sattar, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, state level events, agriculture festival, political power
माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा
CM Eknath Shinde on Badlapur News
Badlapur School Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपीला…”
Who is Neelam Gorhe
Neelam Gorhe : विधान परिषदेच्या आमदार ते कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या शिवसेनेच्या पहिल्या महिला नेत्या; राजकीय पार्श्वभूमी नसतानाही नीलम गोऱ्हेंनी कशी साधली किमया?
Gadchiroli, Dharmarao Baba Atram, Ajit Pawar, Sharad Pawar, Chief Minister, Maharashtra Politics, Nationalist Congress Party, mahayuti, Vidarbha, Election Strategy,
“महायुतीची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री,” कुणी केला हा दावा?

हेही वाचा >> Manoj Jarange Hunger Strike: “उद्या मला जर सरकारनं मारलं किंवा मी मेलो तरी…” म्हणत मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे!

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, “केंद्र आणि राज्य सरकार भाजपाचे आहे. मग या प्रकरणी निकाल द्यायला एवढा वेळ का लावला जातोय? सतत महाराष्ट्रात तणाव वाढत आहे. माझी मागणी आहे की मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावर बोलावं आणि निर्णय द्यावा.”

“जातीय जनगणनेची मागणी राहुल गांधींनी केली आहे. महिला आरक्षणाचं बिल पास केलं. पण अजूनही जातीय जनगणना झालेली नाही. जोपर्यंत बिल पास होत नाही तोवर आमच्या बांधवांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे मी एकच सांगेन की जातीय जनगणना लवकरात लवकर करून आरक्षण द्यावं”, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

मनोज जरांगेंनी उपोषण घेतलं मागे

मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मनोज जरांगेंकडे दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जून ते १३ जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. मात्र काल (मंगळवार, २३ जुलै) रात्री मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली. परिणामी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने सलाईन लावली. त्यामुळे मनोज जरांगे नाराज झाले आहेत. “सलाईन लावून बेगडी उपोषण मी करणार नाही”, असं सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे. जरांगे पाटील सरकारला म्हणाले, “तुम्हाला दोन महिने हवे होते, त्यानुसार मी १३ ऑगस्टर्यंतची मुदत देतो. तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे दोन महिन्यात दिलेला शब्द पाळा.”