पीटीआय, नवी दिल्ली

‘‘महात्मा गांधी हे अवघ्या जगासाठी अमूल्य ठेवा आणि प्रेरणास्त्रोत आहेत. सध्याच्या युगात गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावरून चालल्यास विश्वशांतीचे ध्येय गाठता येऊ शकेल,’’ असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी व्यक्त केला. मुर्मू यांच्या हस्ते राजघाटाजवळील महात्मा गांधींच्या १२ फूट उंचीच्या पुतळय़ाचे अनावरण आणि गांधी वाटिकेचे उद्घाटन करण्यात आले.

Chandrahar Patil On Maharashtra Kesari 2025
Chandrahar Patil : ‘गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

यावेळी बोलताना मुर्मू म्हणाल्या, की बापूंचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात गांधी स्मृती आणि दर्शन समितीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. गांधींजींचा हा पुतळा आणि गांधी वाटिका हे या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. महात्मा गांधींच्या आदर्श आणि मूल्यांनी संपूर्ण जगाला नवी दिशा दिली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जग जेव्हा तीव्र मतभेद आणि संकटांनी ग्रासले होते तेव्हा गांधीजींनी अिहसेचा मार्ग दाखवला अशी आठवण त्यांनी करून दिली.

हेही वाचा >>>Chandrayaan 3 : चंद्रावर ‘विक्रम’ची लांब उडी, इस्रोने शेअर केलेला VIDEO पाहिलात का?

स्वावलंबन, ग्रामस्वराज्य, स्वच्छता आदी अनेक विषयांवर गांधीजींनी अनमोल विचार मांडले. महात्मा गांधींनी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी आणि नैतिकदृष्टय़ा भक्कम भारत निर्माण करण्यावर भर दिला होता. गांधी स्मृती व दर्शन समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीजींचे आदर्श आत्मसात करून भारताच्या विकासासाठी काम करत आहेत ही आनंदाची बाब आहे. सर्व नागरिकांनी विशेषत: तरुण आणि मुलांनी गांधीजींबद्दल जास्तीत जास्त वाचन करून त्यांचे आदर्श आत्मसात करण्याचे आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केले.

गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे उपाध्यक्ष विजय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधींचा हा पुतळा ४५ एकर व्याप्ती असलेल्या ‘गांधी दर्शन’ संकुलाच्या प्रवेशद्वारावर आहे. या वाटिकेत पर्यटकांना आपली छबी टिपण्यासाठी ‘सेल्फी पॉइंट’ही तयार करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या ध्यानस्थ मुद्रेचा हा पुतळा जयपूरच्या कारागिरांनी बनवला आहे.

Story img Loader