पीटीआय, नवी दिल्ली

काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेलीची जागा कायम ठेवणार असून वायनाडची जागा त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी लढवितील, असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सोमवारी जाहीर केले. या माध्यमातून प्रियंका प्रथमच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत.

Archana Patil Chakurkar
अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात लातूर शहर भाजपातील कार्यकर्त्यांची एकजूट
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
The leaders of the constituent parties expressed their sentiments in the condolence meeting that the India Maha Aghadi was united because of Yechury
येचुरींमुळे ‘इंडिया’ महाआघाडी एकत्र! शोकसभेत घटक पक्षांच्या नेत्यांकडून भावना व्यक्त
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Nana Patole gave a reaction about becoming Chief Minister
नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”
anil bonde controversial remark on rahul gandhi
राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाले होते. त्यांना नियमानुसार एक जागा सोडावी लागणार असल्याने त्यावर विचारमंथन करण्यासाठी सोमवारी येथे पक्षांतर्गत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला राहुल, प्रियंका, खरगे यांच्यासह माजी पक्ष्याध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. या बैठकीत प्रियंका गांधी यांना वायनाडची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय आपल्यासाठी कठीण होता. आपले त्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नसून उलट आता वायनाड आणि रायबरेली या मतदारसंघांना प्रत्येकी दोन खासदार मिळतील, असे ते म्हणाले.