शिमला : हिमाचल प्रदेशातील मंडी शहरातील अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनीवर बांधलेल्या मशिदीचा भाग पाडण्याची मागणी करत स्थानिकांनी शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला.

मशीद व्यवस्थापन समितीला मंडी महापालिकेने ३० दिवसांत अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावली आहे. मशीद २३२ चौरस मीटर जागेवर उभी आहे, तर मंजुरी केवळ ४५ चौरस मीटरसाठी आहे, असे या नोटिशीत म्हटले आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत आंदोलकांनी सुरुवातीला मंडई बाजारपेठेत परिसरात मोर्चा काढला आणि सेरी मंचावर धरणे धरले. नंतर त्यांनी मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याच्या तोफांचा वापर केला.

Port Blair Centre renames amit shah
Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan : “…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन् मोदी सरकार कोसळेल”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
Agitating doctors seek President PM Modi intervention
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा! पश्चिम बंगालमधील आंदोलक डॉक्टरांचे पत्र
Jitendra J Jadhav as new head of Aeronautical Development Agency
Jitendra Jadhav: मराठी माणूस देशासाठी लढाऊ विमानांची निर्मिती करणार, कोण आहेत शास्त्रज्ञ जितेंद्र जाधव?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!

हेही वाचा >>> Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार

हिंदू संघटनांनी निषेध मोर्चाची हाक दिल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून मंडीमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. मुस्लीम समुदायाच्या सदस्यांनी गुरुवारी मशिदीचा एक अनधिकृत भाग स्वत: पाडला होता. हे अनधिकृत बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूखंडावर होते. या संदर्भात विभाग आणि महापालिकेने यापूर्वी मशीद व्यवस्थापन समितीला नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांनी राज्यातील जनतेला शांतता आणि बंधुभाव राखण्याचे आवाहन केले.