पीटीआय, न्यूयॉर्क : हिंदू-प्रशांत भागातील ‘जैसे थे’ परिस्थितीत कोणताही एकतर्फी बदल केला जाऊ नये, असे ‘क्वाड’ गटाने म्हटले आहे. तैवानसह दक्षिण चीन सागरात आक्रमक हालचाली करणाऱ्या चीनला हा इशारा देण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका सदस्य असलेल्या ‘क्वाड’ गटाची बैठक झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह चारही देशांचे परराष्ट्रमंत्री बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर गटाकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. ‘‘आंतरराष्ट्रीय कायदे, स्वातंत्र्याची तत्त्वे, लोकशाही मूल्ये यासह कोणत्याही वादावर शांततामय तोडगा काढला जायला हवा. एखाद्या बाजूने त्यात एकतर्फी बदल करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला आमचा विरोध असेल,’’ असे या निवेदनात म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा