लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले. नियमाप्रमाणे त्यांना कोणत्या तरी एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे लागणार आहे. यासाठी त्यांना कोणत्या तरी एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागेल. २०१९ साली जेव्हा राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाला होता, तेव्हा केरळच्या वायनाडमुळेच त्यांना लोकसभेत जाणे शक्य झाले होते. अडचणीच्या वेळेला वायनाडने राहुल गांधींची साथ दिली. आता काँग्रेसच्या परंपरागत रायबरेलीतूनही विजय झाल्यानंतर वायनाड की रायबरेली? असा प्रश्न राहुल गांधी यांच्यासमोर उभा राहिला आहे.

दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्यानंतर राहुल गांधींनी काल रायबरेतील मतदारांची भेट घेतली होती. तर आज केरळमधील नायनाड मतदारसंघातील जनतेशी संवाध साधून त्यांचे आभार व्यक्त केले. राहुल गांधी म्हणाले, माझ्यासमोर आता धर्मसंकट उभे राहिले आहे. मी रायबरेलीचा किंवा वायनाडचा खासदार राहू शकतो. पण मी कोणताही मतदारसंघ निवडला तरी दोन्ही कडील लोकांना आनंदच होणार आहे.

राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi In Rajya Sabha
PM Modi In Rajya Sabha : “लता मंगेशकर यांच्या भावाला कायमचे…” पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत काँग्रेसवर हल्लाबोल
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Image Of Sonia Gandhi And Draupadi Murmu
Sonia Gandhi : राष्ट्रपतींविरोधातील टीका भोवणार? सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार, गुन्हा नोंदवण्याची मागणी
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका

“प्रियंका गांधींनी वाराणसीतून निवडणूक लढवली असती तर…”; राहुल गांधींचा मोठा दावा!

केरळमधील मलप्पुरम येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले, समाजात द्वेष पसरविणाऱ्यांना चपराक बसेल असा २०२४ च्या लोकसभेचा निकाल लागला आहे. माणुसकीचा अंहकारावर आणि प्रेमाचा द्वेषावर विजय झाला आहे.

राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीवरही टीका केली. ते म्हणाले, अयोध्या ज्या मतदारसंघात येते त्या फैजाबादमध्ये भाजपाचा पराभव झाला. लोकांनी हिंसा आणि द्वेषाच्या विरोधात मतदान केले. खरंतर वाराणसीमध्येही पंतप्रधान मोदींचा पराभव होता होता राहिला. भाजपाचा तर अयोध्येत पराभव झालाच. पण वाराणसीनेही मोदींचा मार्ग सहज मोकळा केला नाही.

“भाजपा सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना…”, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना थेट प्रश्न

माझ्यात मोदींप्रमाणे देव नाही, पण…

“मी मोदींप्रमाणे देव नाही. मी साधा माणूस आहे. मोदी सांगतात त्यांच्यात परमात्मा आहे. पण तो परमात्मा सर्व निर्णय अदाणी आणि अंबानी यांच्यासाठी घेतो. त्यांच्यातला परमात्मा एका सकाळी सांगतो, मुंबई विमानतळ अदाणीला देऊन टाका. मोदीजी विमानतळ देऊन टाकतात. मग परमात्मा म्हणतो, आता लखनौ विमानतळही देऊन टाका. मग तेही विमानतळ दिले जाते. मग ऊर्जा प्रकल्पही देऊन टाकले जातात. अदाणींना संरक्षण क्षेत्रात मदत व्हावी, म्हणून अग्नीवीर सारखी योजना आणली जाते. दुर्दैवाने माझ्याकडे अशी दैवी शक्ती नाही, मी फक्त माणूस आहे. पण माझे दैवत देशातील गरीब लोक आहेत. म्हणून मी माझ्या देवाशी चर्चा करतो आणि ते मला काय करायचे हे सांगतात”, असा टोलाही राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

Story img Loader