किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमी देण्यासाठी विरोधक म्हणून आम्ही सरकारवर दबाव आणू असं आश्वासन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. राहुल गांधी यांनी आज दिल्लीत किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – “सरकारी कर्मचारी ‘निकर’वर कामावर येऊ शकतात”, RSS संदर्भातील ‘त्या’ निर्णयावर काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात किमान आधारभूत किंमतीच्या कायदेशीर हमीचा उल्लेख केला होता. आम्ही यासंदर्भात अभ्यास केला आहे. त्यामुळे किमान आधारभूत किमतींसाठी कायदेशीर हमी लागू केली जाऊ शकते, हे मी ठामपणे सांगू शकतो, असं राहुल गांधी म्हणाले. यासंदर्भात आम्ही लवकरच इंडिया आघाडीच्या नेत्याची बैठक घेणार असून या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर आम्ही एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी सरकारवर दाबाव आणू अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – Bypoll Election Results : सात राज्यांतील पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधींची सूचक पोस्ट; म्हणाले, “भाजपाने विणलेले…”

बैठकीपूर्वी राहुल गांधीचीं मोदी सरकारवर टीका

दरम्यान, या बैठकीपूर्वी शेतकऱ्यांना संसदेत प्रवेश न दिल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार टीका केली. मोदी सरकार आम्हाला शेतकऱ्यांना भेटू देत नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. आम्ही काही शेतकऱ्यांना भेटण्यासाठी संसदेत बोलवलं होतं. मात्र, त्यांना आत प्रवेश दिला जात नाही. ते शेतकरी असल्याने त्यांना संसदेत येत येऊ देत नसावे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.