नवी दिल्लीत १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू असून आज (१ जुलै) या अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. पहिल्या अधिवेशनात राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा चालू आहे. दरम्यान, आजचा दिवस हा विरोधी पक्षातील खासदारांचा असल्याचं दिसत आहे. कारण विरोधकांनी NEET पेपर लीक प्रकरणावरून सरकारला घेरलं. पाठोपाठ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचा मुद्दा, नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक, अग्निवीर योजनेला देशभरातून होत असलेला विरोध, ईडी-सीबीआय व आयकर विभागाच्या धाडी तसेच इतर अनेक मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं.

यावेळी राहुल गांधी यांनी भर सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचं आव्हान दिलं. राहुल गांधी म्हणाले, मोदीजी यावेळी आम्ही तुम्हाला गुजरातमध्ये हरवणार, तुम्ही हवं तर लिहून घ्या, विरोधकांची इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये हरवतेय.

Narendra modi rahul gandhi lok sabha
राहुल गांधींच्या घणाघाती भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींची एका वाक्यात प्रतिक्रिया, विरोधकांकडून ‘वाह, वाह’ म्हणत चिमटा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
prasad lad Ambadas Danve
“भाजपात जुम्मा-जुम्मा चार दिवस झालेला माणूस मला…”, सभागृहातील राड्यानंतर अंबादास दानवेंचा प्रसाद लाडांवर हल्लाबोल
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना अनेक वृत्तवाहिन्या व वृत्तसंस्थांना मुलाखती दिल्या होत्या. अशाच एका मुलाखतीत बोलताना मोदी म्हणाले होते की जगाला महात्मा गांधी माहिती नव्हते. महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित ‘गांधी’ चित्रपट आला आणि जगाला महात्मा गांधी समजले. राहुल गांधी यांनी आज सभागृहात मोदींच्या या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. तसेच मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की त्यांचा जन्म जैविकरित्या झालेला नाही. त्यावरूनही राहुल गांधी यांनी मोदींचा चिमटा काढला.

राहुल गांधी म्हणाले, आपले पंतप्रधान थेट परमात्म्याशी संवाद साधतात. परमात्मा मोदींशी चर्चा करतो. आपण सगळे जैविकरित्या (बायोलॉजिकल) जन्माला आलो आहोत. आपला एक दिवस मृत्यू होणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अजैविक (नॉन बायोलॉजिकल) आहेत. त्यांनी म्हटलं की महात्मा गांधींचा मृत्यू झाला आणि गांधी सिनेमा आला म्हणून जगाला त्यांची ओळख झाली. सिनेमामुळे गांधी जगाला समजले, असं त्यांना वाटतं. पण मी या सभागृहाला सांगू इच्छितो की महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही ते आजही जिवंत (विचारांनी) आहेत.

हे ही वाचा >> राहुल गांधींच्या घणाघाती भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींची एका वाक्यात प्रतिक्रिया, विरोधकांकडून ‘वाह, वाह’ म्हणत चिमटा

मोदी महात्मा गांधींबाबत नेमकं काय म्हणाले होते?

नरेंद्र मोदी म्हणाले होते, “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. त्यांचे विचार, त्यांचा संदेश आप जगभरात पोहोचवायला हवा होता, ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणीच ओळखत नव्हतं. मात्र महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभराती लोकांना समजलं गांधी कोण आहे? त्यांच्याबद्दल जगभरात कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीच केलं नाही.”