Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्यानं देशात जातीजनगणना करण्याची मागणी करत आहेत. इंडिया आघाडीतील इतर पक्षांनीही या मागणीचं समर्थन केलं आहे. अशात त्यांनी आता एका सर्वेक्षणावरून पुन्हा जातीजनगणनेची मागणी अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. यावरुन आता पुन्हा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच इंडिया टुडे ग्रुपने देशात जातीजनगणेसंदर्भात एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी देशात जातीजनगणना करण्याची मागणी केली होती. यावरून राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली.

Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
eknath shinde Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
kiren rijiju criticized rahul gandhi
Kiren Rijiju : “बालबुद्धी मनोरंजनासाठी चांगली आहे, पण…” राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजूंची खोचक टीका!

हेही वाचा – Kiren Rijiju : “बालबुद्धी मनोरंजनासाठी चांगली आहे, पण…” राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावरून किरेन रिजिजूंची खोचक टीका!

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

“पंतप्रधान मोदीजी, तुम्ही जर जातीजनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही स्वप्न पाहत आहात. आता कोणतीही शक्ती देशातील जातीजणगणना थांबवू शकत नाही. कारण भारतातील जनतेचा आदेश आला आहे, भारतातील ९० टक्के जनता लवकरच जातीजनगणनेला पाठिंबा देतील आणि मागणी करतील. त्यामुळे जनतेच्या या आदेशाची अंमलबजावणी करा, अन्यथा पुढचे पंतप्रधान हे करताना दिसतील”, असं ते म्हणाले.

राहुल गांधींकडून मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न

महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी हे सातत्याने जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काल उत्तर प्रदेशातील एका सभेत बोलतानाही त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत जाती जनगणनेची मागणी केली होती. “जातीनिहाय जनगणनेमुळे केवळ लोकसंख्या किंवा कोणत्या जातीचे किती लोक आहेत एवढंच समजणार नाही, तर कोणाकडे देशाची किती संपत्ती व संसाधने आहेत? कोणत्या क्षेत्रात कोणाची भागिदारी आहे? हेदेखील समजू शकेल. भारतातील ९० टक्के लोक हे देशाच्या सिस्टिमचा भाग नाहीत. मी अलीकडेच मिस इंडिया झालेल्या महिलांची यादी पाहिली. मला वाटत होतं किमान यामध्ये तरी एखादी दलित तरुणी असेल. मात्र, ही यादी पाहून हिरमोड झाला. त्यात ना दलित तरुणी होती, ना आदिवासी, ना ओबीसी. मीडिया, चित्रपटसृष्टी आणि मिस इंडिया बनणाऱ्या तरुणींमध्ये देशातील ९० टक्के लोकांचं प्रतिनिधित्त्व नाही. देशाचं संविधान केवळ त्या उर्वरित १० टक्के लोकांनी नव्हे तर संपूर्ण १०० टक्के लोकांनी बनवलं आहे”., असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – Rahul Gandhi : “मिस इंडियाच्या यादीत एकही दलित-ओबीसी नाही, यावरून…”, राहुल गांधींचं वक्तव्य

भाजपाकडूनही राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

दरम्यान, राहुल गांधीच्या मागणीवरून भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. “जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना आता मिस इंडिया स्पर्धा, चित्रपट आणि खेळातही आरक्षण हवं आहे. हा केवळ ‘बालबुद्धीचा’ मुद्दा नसून त्यांना समर्थन देणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत. अशी विधानं मनोरंजनासाठी चांगली आहेत. मात्र, त्यांनी आता देशातील मागावर्गीय जनतेची मस्करी करू नये”, असे ते म्हणाले.