लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या भाषणातील काही टिप्पण्ण्या लोकसभाध्यक्षांनी कामकाजाच्या इतिवृत्तातून काढून टाकल्या. त्यावर, काँग्रेसच्या खासदाराने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘मोदीजींच्या जगात सत्य खोडून काढले जाऊ शकते, परंतु प्रत्यक्षात सत्य काढून टाकता येत नाही. मला जे काही म्हणायचे होते ते मी बोललो आणि तेच सत्य आहे. ते त्यांना हवे तितके काढून टाकू शकतात, परंतु सत्याचा विजय होईल’’, असे मत राहुल गांधी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi displeasure as some comments in the speech were removed from the minutes amy
First published on: 03-07-2024 at 07:02 IST