Rahul Gandhi on Rajib Gandhi: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आज काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांना अभिवादन केलं जात आहे. राजीव गांधी यांच्याबद्दलच्या आठवणी ताज्या करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. राजीव गांधींचे पुत्र व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांसाठी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात आपल्या वडिलांची स्वप्न आपली मानून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राहुल गांधींनी नमूद केलं आहे.

“एक करुणामय व्यक्तिमत्व, सौहार्द व सद्भावनेचं प्रतीक”, अशी उपमा राहुल गांधींनी आपल्या वडिलांसाठी पोस्टमध्ये नमूद केली आहे. “बाबा, तुमची शिकवण माझी प्रेरणा आहे. भारतासाठीची तुमची स्वप्नं तीच माझीही स्वप्न आहेत. तुमच्या आठवणी सोबत घेऊन मी ती स्वप्नं पूर्ण करेन”, असं कराहुल गांधींनी वडिलांसाठी केलेल्या पोस्टमध्ये नमूद म्हटलं आहे. आज सकाळी राहुल गांधींनी दिल्लीतील वीर भूमीला भेट दिली. तसेच, राजीव गांधींना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली.

Supreme court on kolkata rape case
Kolkata Rape Case : शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल व्हायला तीन तास का लागले? सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Kailash Vijayvargiya on civil war
Kailash Vijayvargiya: ‘३० वर्षांनंतर गृहयुद्ध होणार’, भाजपा मंत्र्यांचे विधान; काँग्रेस पलटवार करताना म्हणाले, ‘मग महसत्ता कसं होणार?’
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Badlapur School case
Badlapur Sexual Assault Case : “बदलापूरमधील त्या शाळेच्या संचालक मंडळावर भाजपा पदाधिकारी”, ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले…
bharat bandh on august 21
Bharat Bandh : २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या ‘बंद’मागचं नेमकं कारण?

“राजीव गांधींचं अल्पकालीन प्रभावी राजकीय जीवन”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनीही देशाच्या राजकीय व तंत्रज्ञानविषयक पटलावरील विकासात राजीव गांधींच्या योगदानाचा सोशल पोस्टमध्ये उल्लेख केला.

“आज राजीव गांधींची ८०वी जयंती आहे. त्यांचं राजकीय जीवन अल्पकालीन पण अत्यंत प्रभावी ठरलं. १९८५ च्या अर्थसंकल्पात अर्थविषयक धोरणांचा एक नवा दृष्टीकोन मांडण्यात आला होता. या अर्थसंकल्पात राजीव गांधींची महत्त्वाची भूमिका होती. राजीव गांधींच्या हत्येपूर्वी काही आठवडे त्यांनी १९९१ च्या निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यावर बरंच काम केलं होतं. त्यातील आर्थित तरतुदींच्या पार्श्वभूमीवर नरसिंग राव-मनमोहन सिंग यांनी जुलै १९९१ मध्ये देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा राबवल्या”, असं रमेश यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींना चार ऑक्टोबर रोजी ‘म्हणणे’ मांडावे लागणार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक विधान

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी १९८४ साली काँग्रेसची सूत्रं हाती घेतली. अवघ्या ४०व्या वर्षी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. राजीव गांधी हे भारताचे सर्वात कमी वयाचे पंतप्रधान ठरले. २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत राजीव गांधींची एलटीटीईच्या हस्तकांनी सुसाईड बॉम्बेच्या सहाय्याने हत्या केली.