मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची, तर मध्यप्रदेशात भाजपा आणि तेलंगणात भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. आता काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर, राजस्थानमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, “आम्ही तेलंगणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जिंकत आहोत. पण, राजस्थानमध्ये जिंकण्याच्या जवळ आहोत. काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास आम्हाला आहे. भाजपाच्या अंतर्गत सुद्धा हीच चर्चा आहे.”

pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP accuses Congress of dynastic politics nationally now similar issues arise at district level
काँग्रेसला घराणेशाहीचे ग्रहण, चंद्रपूर जिल्ह्यात नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारीसाठी…
Chirag Paswan
Chirag Paswan : उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसला नवं आव्हान; चिराग पासवान यांनी आखली मोठी योजना
Rahul Gandhi
“सत्तेत आल्यानंतर सर्वांत आधी…”, जम्मू काश्मीरच्या नागरिकांना राहुल गांधींचं आश्वासन
karnataka high court on half pakistan remarks by bjp mla
Karnataka High Court: “त्यांचं घर म्हणजे अर्ध पाकिस्तान आहे”, भाजपा आमदाराचं काँग्रेस मंत्र्याबाबत विधान; उच्च न्यायालयानं खडसावलं!
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Amit Shah Said ?
Amit Shah : “श्रीनगरच्या लाल चौकात बिनधोक फिरा”, सुशील कुमार शिंदेंना अमित शाह यांचा टोला

हेही वाचा : लोकसभेत शिवीगाळ झालेल्या मुस्लीम खासदाराची राहुल गांधींनी घेतली भेट, भावूक होत बसपा नेते म्हणाले…

भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून लोकांना विचलित करण्याचं काम भाजपा करत आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

हेही वाचा : मध्य प्रदेश : भाजपाची ‘जन आशीर्वाद’ तर काँग्रेसची ‘जन आक्रोश यात्रा’, जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न!

“बिधुरी यांच्यानंतर निशिकांत दुबे यांचं विधान तुम्ही पाहा. भाजपाचे नेते जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जातनिहाय जनगणना ही भारतातील जनतेला हवी असणारी मूलभूत गोष्ट आहे, हे भाजपाला माहिती आहे. म्हणून त्यावर भाजपाला चर्चा करायची नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.