पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयी रथ रोखण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांची बंगळुरू येथे संयुक्त बैठक नुकतीच पार पडली आहे. या आघाडीची आता पुढची बैठक मुंबईत होणार असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं. तसेच, या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) हे नाव दिलं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, “आमची लढाई भाजपाची विचारधारा आणि त्यांच्या विचाराविरोधात आहे. ते देशावर आक्रमण करत आहेत. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातली पूर्ण संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती चालली आहे. यावर जेव्हा आम्ही चर्चा करत होतो. तेव्हा आम्ही स्वत:शी प्रश्न विचारला की, ही लढाई कुणाविरोधात आहे? तर ही लढाई विरोधक आणि भाजपाविरोधात नाहीये.”

case register against MLA sanjay gaikwad
बुलढाणा : अखेर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल, काँग्रेस आक्रमक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!
Vanraj Andekar Shot Dead in Pune News| Pune Crime News Vanraj Andeka Attack
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून
Tanaji Sawant and ajit pawar
अजित पवार म्हणाले “तर …माझे पण  कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बोलू शकतात,”
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

हेही वाचा >> विरोधकांच्या INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा; म्हणाले, “२६ पक्ष एकत्र आल्याने पंतप्रधानांचे…”

“सध्या देशाचा आवाज चिरडला जात आहे. देशाच्या आवाजासाठी ही लढाई आहे. त्यामुळे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Developmental Inclusive Alliance) म्हणजेच ‘INDIA’. ही लढाई एनडीए आणि INDIA मध्ये आहे. ही लढाई नरेंद्र मोदी आणि ‘इंडिया’मध्ये आहे. ही लढाई त्यांची विचारधारा आणि ‘इंडिया’मध्ये आहे. जो कुणी इंडियाच्या विरोधात उभा राहतो. तेव्हा विजय कुणाचा होतो, हे आपल्याला माहीत आहे. वेगळं सांगायची गरजही नाही,” असं राहुल गांधींनी नमूद केलं.

हेही वाचा- VIDEO : विरोधकांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी कडाडल्या; म्हणाल्या, “हिंमत असेल तर ‘INDIA’ ला…”

“यानंतर आमची बैठक महाराष्ट्रात होईल. आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की, आम्ही एक ‘अॅक्शन प्लॅन’ (कृती आराखडा) तयार करू. सर्वजण एकत्र मिळून देशात आमच्या विचारधारेबाबत बोलू. तसेच देशासाठी आम्ही जे करू इच्छित आहोत, त्याबद्दल बोलू…” असंही राहुल गांधी म्हणाले.