बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपासह सरकार स्थापन केल्यानंतर आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जाहीर भाष्य केले. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये पोहोचली आहे. बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यात आज जाहीर सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्र सोडले. नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर का पडले? याचे कारण सांगतानाच राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्या कोलांटउड्याबाबत बिहारमध्ये एक विनोद तयार झाला असल्याचेही सांगितले.

“नितीश कुमार कुठे फसले? हे मी तुम्हाला सांगतो. बिहारमध्ये जातनिहाय सर्व्हे करावा, अशी मागणी आम्ही नितीश कुमार यांच्याकडे केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकून सर्व्हे करून घेतला. पण दुसऱ्या बाजूनेही त्यांच्यावर दबाव आला. कारण भाजपाला या देशात जातनिहाय सर्व्हे करायचा नाही. या देशात दलित, आदिवासी, वंचित यांची संख्या किती? हे भाजपाला जाणून घ्यायचे नाही. त्यामुळे भाजपाच्या दबावापुढे नितीश कुमार झुकले. भाजपाने त्यांना मार्ग दाखविला आणि नितीश कुमार त्या मार्गाने चालू पडले”, असे भाष्य राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केले.

MLA Sangram Jagtap complains about increase in Bangladeshi infiltrators in Ahilyanagar
अहिल्यानगरमध्ये बांगलादेशी घुसखोर वाढल्याची आमदार संग्राम जगताप यांची तक्रार
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा

राहुल गांधी पुढे म्हणाले, “भाजपाला सामाजिक न्यायाचे तत्त्व मान्य नाही. पण इंडिया आघाडी म्हणून आम्ही सामाजिक न्यायाची भूमिका मांडत राहू आणि त्यासाठी आम्हाला नितीश कुमार यांची गरज नाही.” राहुल गांधी यांनी यावेळी म्हणाले की, आम्ही देशातील बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेकडेही लक्ष वेधले. सत्ताधारी भाजपा या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी द्वेषाची पेरणी करत आहे. ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विषयाकडून दुर्लक्ष होत असल्याचीही टीकाही राहुल गांधी यांनी केली.

या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्याबाबतचा एक विनोदही ऐकून दाखविला. ते म्हणाले, “बिहारचे मुख्यमंत्री राज्यपालांकडे शपथविधीसाठी गेले. खूप धामधूम सुरू होती. भाजपाचे नेते, राज्यपाल आणि आमदार त्याठिकाणी बसले होते. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात आणि सर्वांची सदिच्छा भेट घेऊन निघून जातात. रस्त्यात त्यांना आठवते की, त्यांची शाल राज्यपाल भवनातच राहिली. ते चालकाला सांगतात की, पुन्हा राज्यपाल भवनात चल. चालक वाहन वळवतो आणि राज्यपाल भवनाकडे निघतो. नितीश कुमारांना पुन्हा आलेले पाहून राज्यपाल म्हणतात, इतक्या लवकर परत (शपथविधीसाठी) आलात.”

“बिहारची अवस्था अशी आहे की, मुख्यमंत्र्यांवर थोडासा दबाव पडला तरी ते यु-टर्न घेतात”, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली.

Story img Loader