काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आता उत्तर प्रदेशमध्ये आहे. मंगळवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अमेठी बोलत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील परिस्थितीवर टीका केली. सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघाची तुलना करत असताना राहुल गांधी म्हणाले, “मी वाराणसीला गेलो असता मला तिथे विकास दिसला नाही, मला तिथे उत्तर प्रदेशचे भविष्य दिसले. मद्याच्या नशेत रस्त्याच्या कडेला पडलेले युवक मी पाहिले. बाजाच्या संगीतावर त्यांना झिंगताना मी पाहिले.” यावेळी राहुल गांधी यांनी एका पत्रकाराला त्याच्या मालकाचे नाव विचारले. पण पत्रकाराने उत्तर न दिल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली, त्यानंतर भाषण थांबवत राहुल गांधींनी त्याला मारू नका, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा