देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं राजकीय जीवन अत्यंत क्रूर पद्धतीने संपवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी केला आहे. त्या २५ व्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार सोहळ्यात बोलत होत्या. राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील जवाहर भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोनिया गांधी म्हणाल्या की, “राजीव गांधी यांनी अल्पावधीत यश संपादन केले होते. महिला सक्षमीकरणासह देशाच्या सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. परंतु, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला.”

Eknath shinde mahayuti marathi news
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या मेळाव्याकडे मित्र पक्षांची पाठ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
eknath shinde mathadi workers
माथाडी राजकारणाला शिंदे सेनेची बगल ? मराठा बहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
Sharad Pawar statement that Sitaram Yechury contribution is important in the stability of the United Progressive Alliance government
‘संपुआ’ सरकारच्या स्थिरतेत येचुरींचे योगदान महत्त्वाचे; शरद पवार यांच्याकडून आठवणींना उजाळा
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली

महिला सक्षमीकरणासाठी राजीव गांधी यांचं योगदान

“आज ग्रामीण आणि शहरी भागात १५ लाखांहून अधिक महिला लोकप्रतिनिधी निवडून आल्या आहेत, त्यामागे राजीव गांधी यांचे परिश्रम आणि दूरदृष्टीच कारणीभूत आहे. त्यांनीच पंचायत आणि नगरपालिकांमध्ये महिलांच्या एक तृतीयांश महिला आरक्षणासाठी संघर्ष केला होता. याच सरकारने मतदानाचे वय २१ वरून १८ केले होते”, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

“सध्याच्या काळात द्वेष, समाजात फूट पाडणे, धर्मांधता आणि पक्षपाताचे राजकारण वाढवणाऱ्या शक्ती अधिक सक्रिय होत असल्याने जातीय सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे आदर्श अधिक महत्त्वपूर्ण झाले आहेत. राजीव गांधी हे भारतातील सर्वधर्मसमभावाचे समर्थक होते. धार्मिक, जात, भाषा आणि संस्कृती साजरे करूनच भारताची एकात्मता बळकट केली जाऊ शकते, या वस्तुस्थितीबद्दल ते अत्यंत संवेदनशील होते”, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.