स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी कायमच केली जाते. काही दिवसांपूर्वीच लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणे कर्पूरी ठाकूर, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या एम. एस. स्वामिनाथन यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे. या वर्षी एकूण पाच जणांना भारतरत्न जाहीर झाला आहे. यानंतरही वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसंच उद्धव ठाकरे यांनीही ही मागणी केली. मात्र वीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्कारावर रणजीत सावरकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

हे पण वाचा- “हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मोदी सरकारला बाळासाहेब ठाकरेंचा भारतरत्नसाठी विसर आणि…”, ठाकरे गटाची टीका

वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. रणजीत सावरकर म्हणाले की सध्याचं सरकार हे वीर सावरकरांच्या विचारावर चालणारं सरकार आहे. वीर सावरकर यांचे विचार घेऊन पुढे जातील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. तसंच भारतरत्न पुरस्कारावर त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

रणजीत सावरकर यांनी काय म्हटलं आहे?

सावरकर कुटुंबीयांची ही मागणी कधीच नव्हती की वीर सावरकरांना भारतरत्न मिळावं. स्वातंत्र्यवीर आणि हिंदूहृदय सम्राट या दोन पदव्या ज्या भारतीयांनी त्यांना दिल्या आहेत त्याच आम्ही महत्त्वाच्या मानतो. त्यामुळे या संबंधी आम्ही चर्चा केली नाही आणि करणारही नाही. असं रणजीत यांनी म्हटलं आहे.

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यावर राज ठाकरेंची मागणी

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपण बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारस आहोत त्या नात्याने ही मागणी करतो आहोत की बाळासाहेब ठाकरे यांना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा. अशी एक पोस्ट लिहून मागणी केली. पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

Story img Loader