पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार दीर्घकाळ टिकणार नाही आणि ते लवकरच कोसळेल, असे प्रतिपादन केले. हे सरकार दहशत निर्माण करून आणि धमक्या देऊन निर्माण झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद
extradition with India for Sheikh Hasina
शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?
eknath shinde and ajit pawar 4
स्वाक्षरीवरून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये धुसफूस
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Water cat vulture buffalo breeding center in Maharashtra state
राज्यात पाणमांजर, गिधाड, रानम्हैस प्रजनन केंद्र; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘शहीद दिन’ रॅलीला संबोधित करताना बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारमधील भाजपच्या मित्रपक्षांवर आर्थिक फायद्यासाठी कथित मंत्रीपदांचा त्याग केल्याबद्दल टीका केली. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने चांगली कामगिरी केल्याबद्दल कार्यक्रमाला उपस्थित असलेले समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे बॅनर्जी यांनी कौतुक केले. केंद्रातील सरकार फार काळ टिकणार नाही. हे स्थिर सरकार नाही आणि लवकरच कोसळेल, असे ममता म्हणाल्या.

हेही वाचा >>>देणग्या ताब्यात घेण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांसंबंधीच्या याचिकांवर आज सुनावणी

रालोआतील घटक पक्षांवर टीका

रालोआतील भाजपचे मित्रपक्ष भित्रे आणि लोभी आहेत. ते आर्थिक प्रभोभनाला बळी पडले आहेत. मंत्रालयाऐवजी पैशाचा प्रस्ताव दिल्याचे कोणी ऐकले आहे का? मात्र भाजपच्या भित्र्या व लोभी मित्रपक्षांनी स्वत:च्या स्वाभिमानाचा त्याग केला आहे, अशी टीका बॅनर्जी यांनी केली

अखिलेश यादव यांचे कौतुक

‘शहीद दिन’ रॅलीला उपस्थित असलेल्या अखिलेश यादव यांचे कौतुक करताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये खेळलेला खेळ या राज्यातील सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडेल. मात्र यंत्रणांचा गैरवापर करून भाजप सरकार सत्तेत आहे. परंतु यंत्रणांचा अशा प्रकारे गैरवापर करून तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही.’’