उत्तराखंडमधील हरिश रावत यांचे सरकार म्हणजे एकखांबी तंबू असल्याचे मत व्यक्त करून भाजपने मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्याची मागणी केली आहे. मंत्र्यांचे खातेवाटप अद्यापही करण्यात आलेले नसल्याने त्याचा विपरीत परिणाम विकासकामांवर होत आहे, असेही भाजपने म्हटले आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ रावत यांनी जवळपास एक महिन्यापूर्वी घेतली, तरीही मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे मंत्र्यांकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांच्याकडून, आमच्याकडे खातेच नाही, असे ठरावीक उत्तर ऐकावयास मिळत आहे, असे विरोधी पक्षनेते अजय भट यांनी म्हटले आहे.
‘उत्तराखंडातील रावत सरकार एकखांबी तंबू’
उत्तराखंडमधील हरिश रावत यांचे सरकार म्हणजे एकखांबी तंबू असल्याचे मत व्यक्त करून भाजपने मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्याची मागणी केली आहे
First published on: 27-02-2014 at 02:31 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rawat govt in uttarakhand a one man show alleges bjp