नोटाबंदीच्या निर्णयानंतर सातत्याने नवनवे नियम लागू करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेला टीकेचे लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे बदलतात तसे रिझर्व्ह बँक नियम बदलत आहे, असा उपरोधिक टोला राहुल यांनी हाणला आहे. पंतप्रधानांनी देशाला वचन दिले होते की ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये पैसे टाकता येतील, पण आता नियम बदलला, पंतप्रधानांच्या शब्दाला वजन असायला हवे, पण त्यांनी १२५ वेळा नियम बदलले. त्यामुळे पंतप्रधानांचे आश्वासन पोकळ ठरले आहे, असे राहुल यांनी म्हटले.
यापूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा निर्णय देशातील ९९ टक्के गरीब जनतेविरोधात असल्याचे म्हटले होते. सरकारने भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असता तर आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहिलो असतो. मात्र, मोदींनी घेतलेला निर्णय भ्रष्टाचाराविरोधात नसून गरीब व शेतकऱ्यांविरोधातील आहे, असे राहुल यांनी जौनपूर येथील सभेत म्हटले होते. मोदी देशातील एक टक्का श्रीमंतांसाठी काम करत आहेत. पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला नाहीत. मात्र, ते विजय मल्ल्या यांच्यासारख्या कर्जबुडव्यांशी दयाळूपणे वागतात. मी जेव्हा पंतप्रधानांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तोंडातून चकार शब्दही काढला नाही, असेही राहुल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा