केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेख यांनी भारत माता की जय बोलण्यास नकार देणाऱ्या केरळच्या नागरिकांवर संताप व्यक्त केला आहे. त्या कोझिकोड येथील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. या संमेलनात त्यांनी ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास सांगितलं होतं. परंतु, गर्दीतील काही लोकांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिला. यामुळे मिनाक्षी लेखी यांनी संताप व्यक्त केला.

‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देणाऱ्या जनतेला मिनाक्षी लेखी यांनी विचारलं की भारत तुमची आई नाहीय का? तसंच, त्यांनी घोषणाबाजी करण्यास नकार दिलेल्या एका महिलेला कार्यक्रमस्थळातून निघून जाण्याचीही सूचना केली. या संमेलनाचं आयोजन दक्षिणपंथी संघटनेनं केलं होतं.

Pune Crime News
Pune Crime : “पुण्यात विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराची घटना भयंकर, शाळा प्रशासन..”, सुशीबेन शाह यांनी काय म्हटलंय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे
Sanglit kruti Committee warns that Gadkari will be shown black flags for opposing Shaktipeth
शक्तिपीठ’च्या विरोधासाठी गडकरींना काळे झेंडे दाखवणार, सांगलीत कृती समितीचा इशारा
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”

मिनाक्षी लेखी कोझिकोडमधील एका युवा संमेलनात संबोधित करत होत्या. संमेलनाच्या उत्तरार्धात त्यांनी भाषण आटोपताना भारत माता की जय ची घोषणा केली. परंतु, त्यांना उपस्थितांमधून प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट विचारलं की, “भारत तुमचं घर नाहीय का. भारत फक्त माझी आई का आहे? की तुमचीही आहे? काही अडचण आहे का?”

सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळाल्यावर मिनाक्षी लेखी यांनी पुन्हा ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली. मात्र तेव्हाही कमी प्रतिसाद मिळाला. तसंच, त्यांच्या डाव्या बाजूला बसलेल्या लोकांकडून कमी प्रतिसाद मिळत होता. त्यावेळी एका महिलेला उद्देशून त्या म्हणाल्या, पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिलेने उभं राहावं. इथं-तिथं पाहू नका. मी तुमच्याशी बोलतेय. मी तुम्हाला थेट विचारते, भारत तुमची आई नाहीय का? हा अॅटीट्युड का?

असा प्रश्न विचारल्यावरही त्या संबंधित महिनेले ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या मिनाक्षी लेखी यांनी त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. त्या म्हणाल्या, “मला वाटतं तुम्ही इथून निघून गेलं पाहिजे. ज्यांना देशाचा गर्व नाही, ज्यांना भारताबाबत बोलण्यास लाज वाटते, त्यांना युवा संमेलनात सहभाग घेण्याची गरज नाही.”