नवी दिल्ली : रोहिंग्यांच्या कथित पुनर्वसनाचा वाद चिघळू लागला असून भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात आम आदमी पक्षाला (आप) कोलीत मिळाले आहे. मुस्लीम रोहिंग्या ‘घुसखोर’ असल्याची भूमिका घेणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्ली सरकारच्या अपरोक्ष रोहिंग्यांचे गुपचूप पुनवर्सन करण्याची योजना आखली होती का, असा प्रश्न दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी उपस्थित केला.

केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीप पुरी यांच्या वादग्रस्त बनलेल्या ट्वीटनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन सगळे खापर दिल्ली सरकारवर फोडले होते. रोहिंग्यांना पश्चिम दिल्लीतील बक्करवाला भागातील निम्न उत्पन्न गटातील सदनिका देण्याचा प्रस्ताव दिल्ली सरकारने दिल्याचा दावा केंद्राने केला होता. मात्र या दाव्यावर सिसोदिया यांनी प्रश्नचिन्ह उभे केले असून दिल्ली सरकारला अशा कुठल्या प्रस्तावाची माहितीही नाही. दिल्ली सरकारच्या अपरोक्ष संबंधित प्रस्ताव केंद्राकडे कोणी पाठवला, असा प्रश्न उपस्थित करून सिसोदिया यांनी या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवले असल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली.

After Baba Siddiquis murder Mumbai Police held special meeting to review for vip security
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पोलिसांच्या संरक्षण, सुरक्षा विभागाची विशेष बैठक
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
High Court warns State Governments Urban Development Department over implementation of fire safety rules
अन्यथा सर्व बांधकामांच्या परवानग्या रोखू, अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवरून न्यायालयाचा इशारा
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
Reasons behind the failure of Modi government multi crore oilseeds scheme Pune news
मोदी सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या तेलबियांच्या योजना फसल्या; जाणकारांनी सांगितली अपयशाची कारणे…
Abdul sattar
Video: आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने मंत्री अब्दुल सत्तार संतापले; बाजार समित्यांच्या परिषदेतून काढता पाय
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल

रोहिंग्याच्या पुनर्वसनाचा निर्णय दिल्ली सरकारने घेतल्याचा दावा केंद्र सरकार करते. पण दिल्ली सरकार हा दावा फेटाळत असेल तर केंद्र व दिल्ली सरकारला बाजूला ठेवून रोहिंग्यांसंदर्भातील निर्णय कोण घेत आहे? केंद्रीय नागरी विकासमंत्री रोहिंग्यांच्या पुनर्वसनाचे स्वागत करतात, मग एकाच सरकारमधील गृहमंत्री पुनर्वसनाचा निर्णय झालेला नसल्याचे सांगतात. दोन केंद्रीय मंत्री परस्परविरोधी दावा करत असतील तर या प्रकरणातील सत्य नेमके काय आहे? दिल्ली पोलीस आणि सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधींना वगळून महत्त्वाचे निर्णय घेत आहेत का? या प्रकरणाचे नेमके सूत्रधार कोण आहेत, हे लोकांसमोर आले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका सिसोदिया यांनी घेतली आहे.

‘निर्वासित नव्हे, घुसखोर’

म्यानमारमधून रोहिंग्या बांगलादेशात येतात आणि तिथून ते भारतात घुसखोरी करतात. दिल्लीतही रोहिंग्याची वस्ती असून त्यांना केंद्राने ‘निर्वासित’ नव्हे तर, ‘घुसखोर’ म्हटले आहे. ही अधिकृत भूमिका केंद्राने कधी बदलली? काश्मिरी पंडितांच्या हत्या केंद्राला रोखता आलेल्या नाहीत. पण, घुसखोर रोहिंग्यांचे केंद्र पुनर्वसन करू पाहत आहे. केंद्राला रोहिंग्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करायचे असेल तर, त्यांना घरजावई मानून भाजपशासित राज्यांमध्ये घेऊन जावे व तिथेच त्यांना पक्की घरे द्यावीत, अशी उपहासात्मक टिप्पणीही सिसोदिया यांनी केली आहे.